लाखोरुपये उत्पन्न मिळवून देणारे पीक

लाखोरुपये उत्पन्न मिळवून देणारे पीक,तुळस लागवड,चंदनाची लागवड,कोरफड लागवड,मशरूम लागवड,व्हॅनिला लागवड,इसबगोल लागवड,अश्वगंधा लागवड,मसाल्यांची लागवड,केसर शेती,संत्रा शेती,फुलांची शेती,इलायची लागवड

कृषीप्रधान देश म्हणून भारताची जगभर ओळख आहे. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. परंतु आज-काल शेतकरी बांधव हे जास्त करून उद्योगांकडे आकर्षिले आहेत त्याचे भरपूर कारणे आहेत. कारण की त्यांना शेतीमधून जेवढे पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. आजकाल बहुतांश शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करताना दिसत आहेत. आजच्या या आधुनिक नवीन काळामध्ये विविध प्रकारचे यंत्रे उपलब्ध झाली आहेत.त्यामुळे कृषी क्षेत्रात त्याचा वापर करून चांगला नफा मिळण्यास मदत होईल. विविध प्रकारचे पिके भारत देशात घेतली जातात. घजेणेकरून त्याची लागवड केल्यामुळे आपण करोडपती सुद्धा होऊ शकतो.

   सर्वाधिक उत्पन्न देणारी पिके आहेत तरी कोणती ? असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडत असेल. आज आज आपण जाणून घेणार आहोत की सर्वाधिक उत्पन्न निघणारे पीक कोणते आहे? आणि त्यामधून मिळणारा सर्वाधिक नफा मिळणारे पीक कोणते?

लाखोरुपये उत्पन्न मिळवून देणारे पीक

  • तुळस लागवड
  • चंदनाची लागवड
  • कोरफड लागवड
  • मशरूम लागवड
  • व्हॅनिला लागवड
  • इसबगोल लागवड
  • अश्वगंधा लागवड
  • मसाल्यांची लागवड
  • केसर शेती
  • संत्रा शेती
  • फुलांची शेती
  • इलायची लागवड


आज आपल्या भारत देशामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची पिके आहेत. जी घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे उत्पन्न मिळू शकते आणि अशा पिकांचे लागवड केल्यामुळे आपल्याला भरपूर पैसा देखील मिळवता येईल.

तुळस लागवड

तुळस ही खूप फायदेशीर असून एक औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या रोपांची उंची 30 ते 60 सेमी एवढी असते.या रोपांची लागवड करून आपल्याला करोड रुपये सुद्धा कमवता येतील. त्यामुळे उष्णकटिबंधीय हवामान आणि उष्णकटिबंधीय या दोन्ही योग्य प्रकारच्या आहेत. तुळसी खूप फायदेशीर आहे आणि ही अशी एकमेव वनस्पती आहे. ज्याची लागवड केली असता त्याच्या पिकामध्ये कधीही कमतरता येत नाही. त्याचप्रमाणे आपण त्याची काळजी देखील घेणे खूप गरजेचे आहे.

चंदनाची लागवड

सुगंधी वनस्पतीच्या यादीत चंदन वनस्पतीचे नाव आहे.20 प्रकारच्या चंदनाचा प्रजाती भारतामध्ये आढळून येतात. चंदनाचा वापर विविध प्रकारे करता येतो. त्याचा उपयोग आपण औषध बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे परफ्युम बनवण्यासाठी, अत्तर आणि लहान मुलांची खेळणी बनवण्यासाठी, हवानाचे साहित्य बनवण्यासाठी आणि धार्मिक कारणांसाठी त्याचप्रमाणे इतर अनेक गोष्टींसाठी चंदनाचा वापर करता येतो. चंदनाची लागवड महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात येथे केली जाते. आपण ज्यावेळी चंदन लावतो,त्यावेळी त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी लागणारी माती पाणी आणि योग्य वातावरण गरजेचे असते. आपण करोडपती होऊ शकतो जेव्हा आपण चंदनाची लागवड करू पण त्यासाठी आपल्याला सरकारकडून आधी परवानगी घेणे महत्त्वाचे असते.

कोरफड लागवड

विविध प्रकारे आपल्याला कोरफडीचा उपयोग करता येतो. सध्या कोरफळे चा उपयोग हा सौंदर्यप्रसाधनांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याव्यतिरिक्त ती खूप औषधीही आहे आज कोरफडीला खूप मागणी आहे. आपण कोरफडीची शेती करून उत्पन्न देखील मिळू शकतो. आता येणाऱ्या काळामध्ये कोरफडीच्या मागणीत खूप वाढ होणार आहे. चिकणीची माती कोरफडीच्या लागवडीसाठी चांगली आहे. आजच्या जगात भारतामध्ये विशेष करून कोरफडीच्या खूप प्रकारच्या प्रजाती आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे लोकांच्या घरांमध्ये देखील आज कोरफडी आढळून येतात.

मशरूम लागवड

मशरूमची मागणी सध्या खूप वाढत चालली आहे. त्याच्या मागणी मध्ये दररोज खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मशरूम हे असे एकमेव पीक आहे की त्यामधून त्याच्या खर्चाचा सहापट जास्त नफा आपल्याला होऊ शकतो. त्याचे उत्पादन बाजारातील मागणी मध्ये होत नाही.सध्या मशरूमच्या चांगले वाढ झाली आहे. मशरूमच्या शेतीमुळे आपण करोडपती होऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला योग्य ते प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. मशरूम मे लागवडीसाठी खूप चांगली आहे त्यापासून आपल्याला खूप फायदा  होऊ शकतो.

व्हॅनिला लागवड

परदेशातील व्हॅनिला झाड आहे. व्हॅनिला चा वापर विविध प्रकारे आपण करू शकतो. जास्त करून व्हॅनिला चा वापर हा आईस्क्रीम,परफ्युम, मिठाई, हल्कोहोल असा विविध प्रकारच्या गोष्टी बनवण्यासाठी करतात.दुसऱ्या देशामध्ये व्हॅनिलाला खूप मोठी मागणी आहे आणि दिवसेंदिवस त्याची मागणी वाढत चालली आहे. व्हॅनिला ची लागवड जास्त करून केरळ मध्ये होते. कारण की केरळचे तापमान हे रायगड कोकणचे जुळते आणि येणाऱ्या काळामध्ये व्हॅनिलाला खूप मागणी येऊ शकते.त्याचप्रमाणे वेळेला व्हॅनिलाची लागवड करून आपल्याला खूप पैसे देखील कमवता येतील.

इसबगोल लागवड

इसबगोलची लागवड भारतामध्ये महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब अशा विविध भागात करतात. त्याचा एक औषधी वनस्पती म्हणून गुणधर्म आहे.ये सब वरचे शेती करून आपण करोडो रुपये कमावू. सरकारकडून त्यासाठी अनुदान देखील दिले जाते त्याचा वापर विविध प्रकारे केला जातो. त्याचे बी पचन संस्था, मूत्रमार्ग,बद्धकोष्ठता यावरही उपयुक्त आहे. रेशमी आणि सुती धाग्यांना ताठपणा आणण्यासाठी आणि त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधनांमध्ये याचा वापर केला जातो.

अश्वगंधा लागवड

 आपल्याला अश्वगंधाची लागवड करून खूप सारे उत्पन्न देखील मिळवता येऊ शकते. सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यात अशा रंगाची लागवड होते. जास्त करून बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये याची लागवड केली जाते. अश्वगंधाच्या साली आणि बिया याचा औषधांमध्ये देखील वापर होतो. त्याच्या मागणीमध्ये सध्या खूप वाढ होताना दिसत आहे. सात ते आठ दिवसात अश्वगंधाची बियाणे उगवतात. त्याची कारणे जानेवारी ते मार्च महिन्यात करतात अशाप्रकारे अश्वगंधाची लागवड करून आपण खूप पैसे देखील कमवू शकतो.

मसाल्यांची लागवड

जगभरातील सर्व देशांमध्येच मसाल्याला खूप मागणी आहे. जरी जगभरात मसाल्यांना मागणी असली तरी काही ठराविक देशांमध्येच याची लागवड करतात. आपल्याकडे जर शेती असेल तर आपणही मसाल्यांची शेती करू शकतो.आपणही भरपूर पैसा मिळवू शकतो. जर आपण मसाल्यांची शेती केली तर माती पाणी खत याची माहिती आपण मसाल्यांची लागवड करण्यापूर्वी घेणे गरजेचे आहे. मसाल्यांमध्ये विशेष करून लवंग, मिरी, दालचिनी, इलायची, तेज पत्ता, धने, मेथी, जिरे, हळद, आलं इत्यादीचा आपण समावेश करू शकतो. त्यामुळे मसाल्याची शेती केल्यामुळे आपल्याला भरपूर फायदा हा देखील होऊ शकतो. आणि त्यातून आपण भरपूर पैसा देखील कमवू शकतो.

केसर शेती

केसरला लाल सोनं म्हणतात. आणि ती एक खूप सुगंधी वनस्पती आहे. केशरची लागवड करणे खूप अवघड आहे. पण जर आपण त्याची लागवड योग्य पद्धतीने केली. तर आपण त्यातून करोड रुपये देखील कमवू शकतो. कारण आपण जर त्याची लागवड करायची ठरवली तर आपल्याला त्याचे पेरणीपासून तर त्याची फुलं काढण्यापर्यंत हातानेच त्याची शेती करावी लागते. दीड हजार ते अडीच हजार मीटर उंचीचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून लागवडीसाठी हवे. दोन ते तीन महिन्यांमध्ये केशरची लागवड होते. आणि बाजारांमध्ये देखील हवा त्या रेटमध्ये मोठ्या भावात त्याला विकले जाते.आपण जर केशरची शेती केली तर ती आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकते.

संत्रा शेती

संत्र्याला देखील आजकाल बाजारामध्ये खूप भाव आहे. ते किंचित आंबट आणि गोड चवीचे असते. त्याचप्रमाणे सोनेरी आणि केशरी रंगामुळे ते आणखी उठून दिसते. लिंबाच्या प्रजातीमध्ये याची तुलना केली जाते. जर संत्र्याची लागवड आपण केली तर खूप काही कमी दिवसांमध्ये आपण भरपूर पैसे कमवू शकतो. केळी आणि आंबा नंतर तिसऱ्या पदावर या फळाचा क्रमांक आहे. दोनशे ते अडीचशे झाडे आपल्याला एका एकर मध्ये लावता येतील. या पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला त्याचा एक फायदा नक्कीच आहे. जोपर्यंत त्याचे फळ आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये दुसरे पीक देखील घेऊ शकतो. चिकणीची माती या संत्र्याच्या शेतीसाठी योग्य मानली जाते. पंजाब,नागपूर मध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. जर आपण संत्र्याची लागवड केली तर आपण त्याच्यातून भरपूर पैसा कमवू शकतो.

फुलांची शेती

आपल्याला जर शेती करून करोडपती व्हायच्या असेल तर आपण नक्कीच फुलांची शेती करू शकतो. त्यातून आपल्याला भरपूर पैसा मिळून आपण करोडपती देखील होऊ शकतो. भारतामध्ये तर फुलाला मागणी आहेच त्या व्यतिरिक्त भारत देशातही फुलांमध्ये भरपूर जाती बघायला मिळतात. आणि तिथेही फुलांना भरपूर मागणी आहे. फुल हे खूप आकर्षक असतात आणि सुंदर देखील असतात. आणि औषधी देखील गुणधर्म त्यांच्यामध्ये खूप बघायला मिळतात. फुलांची गरज आपल्याला खूप ठिकाणी लागते. विशेषतः डेकोरेशन साठी, लग्न समारंभासाठी, स्टेज डेकोरेशन साठी, सभा, तसेच फुलांचे गुच्छ,हार, तुरे, पाकळ्या इत्यादींमध्ये फुलांची गरज आपल्याला आढळून येते.
   फुल हे बघितली तर दिसायला खूप छान आणि सुंदर असतात आणि वेगवेगळ्या कलर मध्ये फुल आढळून येतात. फुलांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे त्यापासून विविध प्रकारच्या औषधे देखील तयार करण्यास फायदा होतो. त्याचप्रमाणे अत्तर आणि विविध प्रकारचे सौंदर्यप्रसाधने सुद्धा तयार केले जातात. फुल शेतीमध्ये आपण झेंडू, गुलाब, ग्लॅडोलिअस,सूर्यफूल अशा विविध प्रकारचे फुलांची लागवड आपण करू शकतो. फुलांची जर शेती आपण केली तर त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षातून तीन वेळा आपण त्याची कापणी करू शकतो. म्हणून फुलांची शेती करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

इलायची लागवड

इलायची ची मागणी आज खूप वाढलेली आहे. चहा पासून ते विविध प्रकारचे औषध तयार करण्यापर्यंत इलायची ची गरज भासते. मसाल्यांची राणी म्हणून इलायची ची ओळख आहे. तीन वर्ष इलायची च्या रोपांची पूर्णतः वाढ होण्यासाठी लागतात. जर या रोपांची वाढ पूर्ण झाली तर 25 ते 30 वर्षापर्यंत आपण त्याच्यातून उत्पन्न घेऊ शकतो. उष्ण वातावरण उष्णकटिबंधी हवामान इलायची साठी खूप योग्य मानले जाते. इलायची साठी 10 अंश सेंटीग्रेड ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान गरजेचे आहे.

आपण इलायची एका एकर मध्ये 150ते 170 किलो उत्पादन मिळते.पाच ते सात फूट या रोपांची उंची असते. बाजारामध्ये इलायची ला खूप मागणी आहे. ते दोन ते पाच हजार रुपये किलो दराने बाजारात विकली जाते. इलायची चे लहान आणि मोठे असे दोन प्रकार असतात. इलायची मुळे पदार्थाला एक वेगळी चव आणि सुगंध येतो. त्यामुळे इलायची चे उत्पन्न घेतले तर आपण खूप पैसे मिळवू शकतो.

आपण शेती करून कशाप्रकारे श्रीमंत होऊ शकतो?

वरील माहिती नुसार जर आपण पीक घेतले तर त्यातून आपल्याला पुष्कळ नफा होऊ शकतो. आणि हे पिके वेळेवर चांगली किंमत देणारी असतात. त्यामुळे या पिकांची जर लागवड आपण केली तर आपण खूप कमी दिवसात खूप श्रीमंत आणि कोट्याधीश देखील होऊ.

हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी

Leave a Comment